निसर्ग -एक जादूगार






जून -जुलैमध्ये शाळा -महाविदयालय सुरु झाली की ,नित्यनेमाने वर्षाऋतूचे आगमन होते . आषाढ महिन्यात तर सूर्याचे दर्शन दुर्लभ होतो . पाऊस असो वा नसो ,दिवसभर मळभ असते . त्या कुंद वातावरणात मन थोडेसे उदास झाले असताना समोर दिसणाऱ्या टेकडीकडे सहजच लक्ष गेले आणि आश्चर्याचा धक्का बसला . मे महिन्यात ओकीबोकी दिसणारी ,मातीने लाल दिसणारी ही टेकडी आता जणू हिरवा शालू नेसून नववधूसारखी सजून उभी होती . मे महिन्याच्या सुट्टीत कितीतरी वेळा मी  या टेकडीवर गेलो होतो .  सुसाट वाऱ्याबरोबर तेथे धावलो होतो . या रखरखीत भूमीतून हिरवे अंकुर कधी फुटतील असे वाटलेच नव्हते . कवी मंगेश पाडगावकर यांच्या 'सत्कार 'कवितेचे चरण ओठावर आले -'पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार '. ही सारी किमया कोणी केली ?तो किमयागार आहे -निसर्ग !

12 comments:

निसर्गाच्या सहवासात

निसर्गाच्या सहवासात 




माणसाचे निसर्गाशी असलेले नाते जुने आणि अतूट आहे . लहानग्या रडणाऱ्या मुलाला आई काऊ- चिऊ दाखवून गप्प करते . प्रत्येक्ष भगवान रामचंद्राना ते बाळरूपात असताना ,चंद्रच हवासा वाटला होता .बाळपणातून कुमारवयात जातानाही आपला बराच काळ निसर्गाच्या  सहवासातच जातो . जसे ,नदीत डूबने ,झाडावर माकडासारखे चढून कैऱ्याचिंचा खाणे ,वडाच्या पारंब्यांना पकडून सूरपारंब्यांचा खेळ खेळणे इत्यादी . सुट्टीत खेडेगावात आजोळी वा काकांकडे जाणारी मुले वाडयाच्या सावलीत बसण्याऐवजी टोळकी करून मळयातून ,शेतातून ,रानातून का भटकतात.?असा प्रश्न मोठ्यांना पडतो . हे आहे निसर्गाचे आकषर्ण . दर सुट्टीतपदभ्रमणाला ,गिर्यारोहणाला आणि व्यवस्थित योजना आखून देशोदेशीची माणसे हिमालयावर चढाईसाठी का 
जातात ? ही आहे रक्तातली निर्सगाची ओढ !

0 comments:

माझी सुखाची कल्पना

माझी सुखाची कल्पना

प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना भिन्न भिन्न असतात . अगदी व्यक्ती तितक्या प्रकृती !त्यामुळे प्रत्येकाने सुखाच्या व्याख्याही वेगवेगळ्या केलेल्या आहेत . कुणाचे मुठभर धान्यात ही सुख साठवलेले असते ,तर कुणाला धान्याच्या राशीवर लोळताना ही उद्याची काळजी ,चिंता या सुखाला पोखरणाऱ्या जळवा असतात .

3 comments: