• Convallis consequat

    Lorem ipsum integer tincidunt quisque tristique sollicitudin eros sapien, ultrices primis volutpat tempor curabitur duis mattis dapibus, felis amet faucibus...

  • Augue nullam mauris

    Lorem ipsum integer tincidunt quisque tristique sollicitudin eros sapien, ultrices primis volutpat tempor curabitur duis mattis dapibus, felis amet faucibus...

  • Donec conubia volutpat

    Lorem ipsum integer tincidunt quisque tristique sollicitudin eros sapien, ultrices primis volutpat tempor curabitur duis mattis dapibus, felis amet faucibus...

  • Primis volutpat tempor

    Lorem ipsum integer tincidunt quisque tristique sollicitudin eros sapien, ultrices primis volutpat tempor curabitur duis mattis dapibus, felis amet faucibus...

चांदण्यातील सहल


कॉलेजजीवनात 'सहल 'हा सगळ्याच्या आवडीचा आणि उत्साहाचा विषय असतो आतापर्यंत आमच्या
मित्रमंडळीच्या अनेक सहली काढून झाल्या होत्या . वर्षासहल काढून पावसात चिंब भिजण्याची हौसही आम्ही भागवून घेतली होती . या वेळेस काही नवे अनुभवावे असे  वाटत होते . अलीकडच्या काळात टयूबलाईटच्या  चकचकाटमुळे चांदणे  अनुभवताच येत नाही . त्यामुळे मग सगळ्यांच्या मते चांदण्यातील सहल काढण्याचे ठरले . आमच्या भूगोलाच्या अध्यापकांनीही आमच्या कल्पनेला दुजोरा दिला . गावाबाहेरच्या , जवळच्याच एका टेकडीवर जाण्याचे ठरले . जमल्यास तारांगणाचाही थोडा अभ्यास करायचा होता . बरोबर दुर्बिणीही घेतल्या होत्या .

निसर्ग -एक जादूगार






जून -जुलैमध्ये शाळा -महाविदयालय सुरु झाली की ,नित्यनेमाने वर्षाऋतूचे आगमन होते . आषाढ महिन्यात तर सूर्याचे दर्शन दुर्लभ होतो . पाऊस असो वा नसो ,दिवसभर मळभ असते . त्या कुंद वातावरणात मन थोडेसे उदास झाले असताना समोर दिसणाऱ्या टेकडीकडे सहजच लक्ष गेले आणि आश्चर्याचा धक्का बसला . मे महिन्यात ओकीबोकी दिसणारी ,मातीने लाल दिसणारी ही टेकडी आता जणू हिरवा शालू नेसून नववधूसारखी सजून उभी होती . मे महिन्याच्या सुट्टीत कितीतरी वेळा मी  या टेकडीवर गेलो होतो .  सुसाट वाऱ्याबरोबर तेथे धावलो होतो . या रखरखीत भूमीतून हिरवे अंकुर कधी फुटतील असे वाटलेच नव्हते . कवी मंगेश पाडगावकर यांच्या 'सत्कार 'कवितेचे चरण ओठावर आले -'पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार '. ही सारी किमया कोणी केली ?तो किमयागार आहे -निसर्ग !

निसर्गाच्या सहवासात

निसर्गाच्या सहवासात 




माणसाचे निसर्गाशी असलेले नाते जुने आणि अतूट आहे . लहानग्या रडणाऱ्या मुलाला आई काऊ- चिऊ दाखवून गप्प करते . प्रत्येक्ष भगवान रामचंद्राना ते बाळरूपात असताना ,चंद्रच हवासा वाटला होता .बाळपणातून कुमारवयात जातानाही आपला बराच काळ निसर्गाच्या  सहवासातच जातो . जसे ,नदीत डूबने ,झाडावर माकडासारखे चढून कैऱ्याचिंचा खाणे ,वडाच्या पारंब्यांना पकडून सूरपारंब्यांचा खेळ खेळणे इत्यादी . सुट्टीत खेडेगावात आजोळी वा काकांकडे जाणारी मुले वाडयाच्या सावलीत बसण्याऐवजी टोळकी करून मळयातून ,शेतातून ,रानातून का भटकतात.?असा प्रश्न मोठ्यांना पडतो . हे आहे निसर्गाचे आकषर्ण . दर सुट्टीतपदभ्रमणाला ,गिर्यारोहणाला आणि व्यवस्थित योजना आखून देशोदेशीची माणसे हिमालयावर चढाईसाठी का 
जातात ? ही आहे रक्तातली निर्सगाची ओढ !

माझी सुखाची कल्पना

माझी सुखाची कल्पना

प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना भिन्न भिन्न असतात . अगदी व्यक्ती तितक्या प्रकृती !त्यामुळे प्रत्येकाने सुखाच्या व्याख्याही वेगवेगळ्या केलेल्या आहेत . कुणाचे मुठभर धान्यात ही सुख साठवलेले असते ,तर कुणाला धान्याच्या राशीवर लोळताना ही उद्याची काळजी ,चिंता या सुखाला पोखरणाऱ्या जळवा असतात .